Share

‘राजीव गांधींनी पवारांना ओळखून कधीच जवळ केलं नाही, पण राहूल गांधी तेवढे परिपक्व नाहीत’

Published On: 

मुंबई : २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे भाजपला देशभरात मोठा फायदा झाला. विविध राज्यांसह केंद्रात देखील भाजपने सत्ता काबीज केली. यानंतर, देशातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेससह विविध भाजप विरोधी पक्षांची घसरण सुरु झाली. यामुळे २०१९ मध्ये अधिक संख्याबळाने मोदी सरकार स्थापन झाले.

आता गेल्या दीड वर्षात विरोधकांची एकजूट करून भाजप विरोधात प्रबळ विरोधक निर्माण करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. देशभरातील विविध भाजप विरोधी नेत्यांना एकत्रित करून भाजपची राष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्यासाठी शरद पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांची चांगलीच आक्रमकता पाहायला मिळाली.

दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ‘१०० खासदारांची आघाडी तयार करून विरोधकांना वाटतयं मोठं काम झालं. राहुल गांधी कधीच सुधरणार नाही, स्व. राजीव गांधी यांनी पवार साहेबांना ओळखून त्यांना कधी जवळ केलं नाही कारण त्यांना माहीत होतं पवार साहेब कधी सटकतील कळणार नाही पण राहुल गांधी आपले कोण परके कोण कळण्याइतके परिपक्व नाही,’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!