Share

“आमच्यासाठी ‘राज’ आदेश अंतिम”, मनसे नेत्याचा ट्वीट करत इशारा; औरंगाबादेत संघर्ष पेटण्याची शक्यता

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळावा तसेच महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत मशिदीवरील भोंग्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला होता. मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला ३ मेचा अल्टीमेटम दिला होता. अन्यथा ४ तारखेपासून ऐकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यातच काल त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. “आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही, त्यांना एकदा हनुमान चालीसा ऐकवाच” असं म्हणत राज ठाकरे यांनी माघार घेण्यास साफ नकार दिला आहे. यासंदर्भातच औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष सुमित खांबेकर (Sumit Khambekar) यांनी ट्वीट करत इशारा दिला आहे.

“ज्यांनी आमच्या विचारांना पाठिंबा दिला त्यांचे मनःपूर्वक आभार,आमच्यासाठी ‘राज’ आदेश अंतिम!”, असे ट्वीट सुमित खांबेकर यांनी केले आहे. दरम्यान महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभा घेत पुन्हा एकदा मशिदीवरील भूमिका मांडली होती. त्यामुळे शहरात संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी आपल्या भूमिकेबद्दल माघार घेण्यास साफ नकार दिला आहे. त्यांच्यावर औरंगाबादेत गुन्हा दाखल झाला आहे. तर पोलीस यंत्रणा कडक पावलं उचलण्याच्या तयारीत असताना “देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की, उद्या ४ मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोग्यांवर हनुमान चालीसा लावावी. भोग्यांचा त्रास काय होतो, हे त्यांनाही समजू दे.”, असे आदेश त्यांनी पत्रकाद्वारे दिले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!