Share

“शरद पवारांना आदर्श नेतृत्व संबोधणारे राज ठाकरे अचानक यु टर्न…”, राजेश टोपेंचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळावा तसेच महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर जातीपातीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. तसेच मशिदीवरील भोंग्याबाबतही त्यांनी अल्टीमेटम दिला होता. यावर आता अनेक प्रतिक्रिया उमटत असताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी राज ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. दोन वर्षांपूर्वी आदरणीय शरद पवार साहेबांच्या कार्याचा गौरव करणारे, आदर्श नेतृत्व म्हणून संबोधणारे राज ठाकरे अचानक यु टर्न घेत साहेबांना जातीयवादी ठरवत विपरीत भूमिका घेतात तेव्हा पाणी कुठेतरी मुरतेय हे लगेच लक्षात येते. जातीयवाद नेमका कोण करतोय हे सर्वांना माहिती आहे. राज ठाकरेंनी नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.”, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ३ तारखेचा अल्टीमेटम दिला होता. तर कालच त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. “आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही, त्यांना एकदा हनुमान चालीसा ऐकवाच” असं म्हणत राज ठाकरे यांनी माघार घेण्यास साफ नकार दिला आहे. राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादेत गुन्हा दाखल झाला आहे. तर पोलीस यंत्रणा कडक पावलं उचलण्याच्या तयारीत असताना राज ठाकरेंनी पत्रक प्रसिद्ध करून आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!