Share

Rain Update : आज पुन्हा ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार जोरदार पाऊस ; पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाला पुन्हा एकदा सुरवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे . दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) आणि हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाज नुसार आजपासून राज्यात पावसाचा जोर अजूनच वाढणार आहे. मित्रांनो राज्यात पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जाणकार लोकांकडून केले जात आहे.

पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज

पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. दरम्यान हवामान तज्ञ पंजाबरावं डख यांचादेखील हवामान अंदाज आला आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यात 22 सप्टेंबर पर्यंत जोरदार पाऊस कोसळणार आहे.

काल सोमवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.

मात्र पुण्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. यामुळे पुणे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजधानी मुंबई, कोकणातील रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि मराठवाड्यातील उस्मानाबादमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार् असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. ठाणे, पालघर या जिल्ह्यात पावसाची मात्र उघडीप राहणार आहे. एकंदरीत हे जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!