Share

आयपीएल २०२२ मधील २ नविन संघाचा समावेशावर प्रश्नचिन्ह; ‘हे’ कारण आले समोर

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही दिवसापासुन कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. या स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने बीसीसीआयने तत्काळ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. उर्वरित स्पर्धा कधी आणि कुठे होईल याबद्दल अद्यापही प्रश्चचिन्ह आहे.

यादरम्यान बीसीसआयने आयपीएल २०२० स्पर्धेत दोन नविन संघाचा समावेश होणार हे सांगितले होते. पण आयपीएल २०२१ स्पर्धाच अर्धवट असल्याने पहिली प्राथमिकता ही उर्वरीत स्पर्धा पुर्ण करणे ही आहे. त्यानंतर पुढील हंगामात सहभागी होणाऱ्या नविन संघाबद्दल विचार करता येईल. आता त्याबद्दल बोलायला कुणाकडेच वेळ नाही. असे बीसीसीआयच्या एका अधीकाऱ्याने सांगितले आहे. आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित झाल्याने पुढील हंगामासाठी दोन नविन संघासाठी निवीदा जाहीर करणे टाळले जाउ शकते अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.

यावर्षीच्या आखेरीस दोन नवीन संघासाठी निवीदा निघणार होत्या असे बीसीसीआयने सांगितले. मात्र आयपीएल २०२१ हंगाम पूर्ण करण्याचे आव्हान बीसीसीआय समोर सध्या आहे. यादरम्यान पुढील काही महिन्यांत सर्व आंतरराष्ट्रीय संघांचे वेळापत्रक व्यस्त आहे. त्यामुळे सर्वच गोष्टींचा विचार करुन बीसीसीआयला काही निर्णय घ्यावे लागतील तसेच आयपीएल २०२१ हंगाम पूर्ण झाला नाही तर जवळपास २५०० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते असे सौरव गांगुलीने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!