Share

“राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल”, जितेंद्र आव्हाडांनी भाजपला डिवचले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात सध्या राणा दाम्पत्याला अटक तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने यावर आक्रमक भूमिका घेत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. यावरच राष्ट्रवादी नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत भाजपला डिवचले आहे.

“राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल”, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. दरम्यान आजच किरीट सोमय्या तसेच भाजप नेत्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांची भेट घेत झालेल्या प्रकरणाबाबत दाद मागणार आहेत. यासाठी सोमय्या दिल्लीत पोहोचले आहेत.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1518311741184221184

दरम्यान किरीट सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा असूनही पोलिसांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर दगड भिरकावला. यात सोमय्यांना किरकोळ दुखापत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी सोमय्यांचा एफआयआर दाखल करून घेण्यासही नकार दिला होता. त्यामुळे भाजपने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याचे म्हणत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!