Share

पंजाबी अभिनेता दीप सिद्धूवर आंदोलन चिघळवल्याचा आरोप…

Published On: 

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत शेतकरी आंदोलकांनी टॅक्टर मोर्चा काढून निषेध केला. मात्र, यावेळी आंदोलक आक्रमक झाल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली होती. राजधानी दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी शांततेत आंदोलन करत होते. पण दोन महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध तुटला. त्यांनी उग्र आंदोलन केलं. याला जबाबदार कोण आहे? दोन महिन्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा का नाही काढला?

आंदोलनातील हिंसाचार म्हणजे सरकारचं अपयश अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर येत असतानाच हरियाणातील शेतकरी नेते गुरणाम सिंह यांनी पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याच्यावर आंदोलनामध्ये हिंसाचार घडल्याचा आरोप केला आहे. दीप सिद्धू हा एक पंजाबी अभिनेता असून त्याने रमता जोगी या सिनेमातून पदार्पण केले असून ‘जोरा दास नुंबरिया’ सिनेमांमध्ये गॅंगस्टर ची भूमिका निभावली आहे.

२०१९ मध्ये जेव्हा अभिनेते सनी देओल हे लोकसभा निवडणूक लढवत होते त्यावेळी त्यांच्या प्रचार मोहिमांमध्ये दीप सिद्धूचा देखील समावेश होता. मात्र दीप सिद्धूवर आंदोलनाची घडल्याचा आरोप झाल्यानंतर खासदार  सनी देओल यांनी ट्विट करत, ‘लाल किल्ल्यावर जे झालं त्याने मी दुःखी आहे. मात्र दीप सिद्धू याच्याशी माझा किंवा माझ्या परिवाराचा कोणताही संबंध नाही.’

आंदोलनादरम्यान दीप सिद्धू याने लाल किल्ल्यावर निशाण साहिब चा झेंडा लावला तर त्याने यावेळी तिरंगा हटवून हा झेंडा लावण्यात आल्याचा आरोप यावेळी शेतकरी नेते गुरनाम सिंह आणि योगेंद्र यादव यांनी केला आहे. मात्र यावर स्पष्टीकरण देताना दीप सिद्धूने सांगितले की, ‘आम्ही लोकशाही मार्गाने आमचा झेंडा लाल किल्ल्यावर फडकवला मात्र आम्ही यावेळी तिरंग्याला हटवले नाही.’

महत्वाच्या बातम्य

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!