Share

‘जिवाची काळजी असेल तर…’ पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी साधला मोदींवर निशाणा

Published On: 

चंदीगढ: पंजाबच्या दौऱ्यावर असताना फिरोजपूर येथे पंतप्रधान नरेंद मोदींच्या (PM Narendra Modi) सुरक्षेतील त्रुटीवरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्यांनी कॉंग्रेस तसेच पंजाब सरकारवर चांगलीच टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेत्यांनी देखील भाजपच्या टीकांना प्रत्युत्तर दिले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी देखील पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

दरम्यान पंजाबचे गृहमंत्री सुखजिंदर सिंग (Sukhjindar Singh) यांनीही ट्विट करत, पंजाब आता तुम्हाला माफ करणार नाही, असे वक्तव्यं केले आहे. त्यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे त्यांच्या बरखास्तीची मागणी देखील केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष अश्विनी शर्मा (Ashwini Sharma) यांनी देखील ट्विट करत म्हणले आहे की, पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याने पंजाब आता विकास प्रकल्पांपासून वंचित राहिला आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Punjab CM Charanjit Singh Channi) यांनी पंतप्रधानांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विधानाचे उदाहरण देत त्यांनी पटेल यांचा फोटो शेअर करत ट्विट केले की, ज्यांना कर्तव्यापेक्षा जिवाची अधिक काळजी आहे त्यांनी भारतासारख्या देशात मोठी जबाबदारी घेऊ नये, असं ट्विट त्यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!