🕒 1 min read
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील बदायूंमध्ये एका 50 वर्षांच्या महिलेवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. यामुळे उत्तर प्रदेशमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. पीडित महिलेच्या घरी गुरुवारी राष्ट्रीय महिला सदस्य चंद्रमुखी देवी पोहचल्या होत्या त्यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी या महिलेची विचारपूस केली. मात्र, त्यानंतर त्यांनी अतिशय धक्कादायक विधान केले.
त्यांचे म्हणणे आहे की, ही पीडित महिला जर संध्याकाळी घराबाहेर पडली नसती तर ही घटना घडली नसती. चंद्रमुखी देवीच्या या विधानानंतर बॉलिवूड अभिनेत्रीनी देखील संताप व्यक्त केला आहे. ट्विटरवर चंद्रमुखी देवी यांच्या या विधानाचा व्हिडिओ रिट्विट करत तापसी पन्नूने लिहिले की, ‘जर देशात या मानसिकतेचे लोक नसते तर अशी घटना घडली नसती.’
If people with her kind of thinking didn’t exist in this country toh aisi ghatna nahi hoti. #Hopeless #Shame https://t.co/Zcs7iYaWV4
— taapsee pannu (@taapsee) January 7, 2021
तापसीच्या ट्विटनंतर उर्मिला मातोंडकरने ट्विट केले की, ‘ही मानसिकता आतमधून बदलण्याची आवशक्ता आहे. तोपर्यंत काही बदल होण्याची शक्यता नाही आणि एक महिला दुसऱ्या महिलेला गुन्हेगार कसे म्हणू शकते. हे अतिशय खेदजनक आणि दुर्दैवी आहे.
This mentality is what needs to change from within..n till then there is no hope of betterment ???????? How can women only victimise other women like this..sad n unfortunate
@NCWIndia @sharmarekha https://t.co/xMNE9yFUJ2— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) January 7, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हावं ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा, तीन पक्ष मिळून तोडगा काढू’
- ब्रिस्बेनमध्ये लॉकडाऊन; कसोटीच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह
- गोसेखुर्द प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आश्वासन
- कॉंग्रेसचे दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री माधव सिंह सोलंकी यांच निधन
- लोहगाव आणि धानोरीला आजपासून मिळणार भामा आसखेडचे पाणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

