Share

दिल्लीतील राष्ट्रीय ध्वजाच्या अवमानाचा औरंगाबादेत निषेध

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर हिंसक आंदोलनादरम्यान राष्ट्रीय ध्वजाचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येत रोष व्यक्त केला. शहरातील क्रांती चौकाजवळील स्वातंत्र्य संग्राम स्मारकाजवळ गुरुवारी सायंकाळी सहा वाजता शहरातील नागरिकांनी राष्ट्रगीत व प्रतिज्ञा म्हणत राष्ट्रध्वजाला वंदन केले.

राजधानी दिल्ली येथे काही समाजकंटकांनी राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केला व पोलिसांवर हल्ले करत थेट लाल किल्ल्यावर दुसरा ध्वज फडकावला, हे लाजिरवाणे दृश्य पाहून देशातील सामान्य जनतेच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करणे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे, असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

आपल्या देशाचा सन्मान आपला तिरंगा ध्वज असून त्याच्या रक्षणासाठी चिनी सीमेवर, पाकिस्तानी सीमेवर आपल्या पराक्रमी जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. आपले प्राण अर्पण करून त्यांनी संरक्षण केले. 26 जानेवारीला त्यांना परमवीर चक्राने सन्मानित करून हा देश एकीकडे त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतो आहे, तर दुसरीकडे त्याच तिरंग्याचा अपमान केला जातो आहे. या घटनेमुळे शहीद जवानांचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा अवमान केला जात असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या उपक्रमासाठी शहरातील निखिल उऱ्हेकर, शैलेश पवार, राजेश पोतदार, रवी संघई, गणेश कुलकर्णी, विवेक बाप्ते, सागर शिंदे यांनी परिश्रम घेतले.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!