मुंबई: पुरोगामी असलेले महाराष्ट्र राज्य सरकार हे आता हळूहळू प्रतिगामी व्हायला लागलंय असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज ट्वीटर च्या माध्यमातून व्यक्त केले.
आंबेडकर पुढे म्हणाले की कोरोनाच्या काळात लॉकडाऊन उठवताना केंद्राने काही गाईडलाईन दिल्या होत्या, त्यादेखील मान्य करायला महाराष्ट्र सरकार तयार नाही. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत बिकट होत चालली असून महाराष्ट्र सरकारने बेभरवशावर न राहता निर्णय घेणारे राज्य म्हणून पुन्हा लौकिक मिळवावा.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर पाहूया त्यांच्याच शब्दात “महाराष्ट्र शासन पुरोगामीत्व आणि निर्णय क्षमतेसाठी ओळखलं जातं, पण ते हळूहळू प्रतिगामी होताना दिसतंय. केंद्राने लॉकडाउन उठवण्यासाठी दिलेल्या गाईडलाईन्स महाराष्ट्र शासन मान्य करायला तयार नाही. ज्याप्रकारे इतर राज्यांनी मंदिरं आणि आर्थिक केंद्र चालू करून अर्थव्यवस्थेला गती दिली” अशा आशयाचं ट्वीट आंबेडकरांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- जलयुक्त शिवारातील जनसहभागाचीही चौकशी करणार का?- चंद्रकांत पाटील
- जलयुक्त शिवार कामांची खुली चौकशी करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
- पंढरपूरच्या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
- मुंबईची तुंबई होऊ द्यायची नसेल तर ‘हे’ करा; गडकरींनी ठाकरेंना सांगितला रामबाण उपाय
- कैदेतून सुटका होताच मेहबुबा मुफ्ती यांनी ओकली पुन्हा गरळ,म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

