🕒 1 min read
नवी दिल्ली- कश्मीरमधील कलम 370 हटविण्याच्या मुद्दय़ावरून माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती केंद्र सरकार विरोधात पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. मंगळवारी रात्री कैदेतून सुटका होताच त्यांनी लढाई सुरूच राहील. जे हिसकावले ते परत मिळवणार, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे.
केंद्र सरकारनं जम्मू काश्मिरला विशेष दर्जा देण्याचं कलम रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जम्मू व काश्मिरातील अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. माजी मेहबुबा मुफ्ती यांनाही प्रशासनानं ताब्यात घेत नजरकैदेत ठेवलं होतं. अखेर मंगळवारी त्यांची सुटका करण्यात आली. त्यांच्या मुलीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर ही जम्मू काश्मीर प्रशासनानं त्यांना मुक्त केलं.
After being released from fourteen long months of illegal detention, a small message for my people. pic.twitter.com/gIfrf82Thw
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) October 13, 2020
त्या पुढे म्हणाल्या,’५ ऑगस्ट २०१९ या काळ्या दिवशी घेण्यात आलेला निर्णय माझ्या ह्रदयावर घाव घालत राहिला. मला विश्वास आहे की, अशीच परिस्थिती जम्मू काश्मीरमधील लोकांची असेल. जनता तो विसरणार नाही. आता आपल्याला निर्धार करावा लागेल की, ५ ऑगस्ट रोजी दिल्लीनं बेकायदेशीरपणे जे हिसकावून घेतलं, ते परत घ्यावं लागेल. असा इशारा मुफ्ती यांनी मोदी सरकारला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- स्वतंत्र राज्य निवडणूक विभाग करण्याचा पूर्वीचा निर्णय रद्द
- जलयुक्त शिवार कामांची खुली चौकशी करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
- पर्यावरणवादी कांदळवन असलेल्या जागेवर, वन संरक्षित जागेवर कारशेडचे समर्थन करणार का?
- मेट्रो कारशेडचं पितळ उघड केल्याच्या पोटशूळातूनच जनसहभागाच्या योजनेवर अविश्वास
- जलयुक्त शिवार योजना झोलयुक्त : भ्रष्टाचाराच्या एसआयटी चौकशीचे कॉंग्रेसने केले स्वागत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
