मुंबई : सध्या राज्यातील राजकीय वातावरण गढुळ झालं आहे. तसेच काही देशातील झालंं असल्याचं पाहायला मिळतं आहे. अनेक उलाढाली होताना दिसून येतं आहेत. अशताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा आणि त्यांच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षाचा मोठा धक्का बसला असल्याचं समजतं आहे. गुलाम नबी आझाद बऱ्याच दिवसांपासून नाराज होते. त्याचप्रमाणे ते पक्षाच्या धोरणांबद्दलही नाराज होते.
यानंतर त्यांना काँग्रेसने त्यांना जम्मूमधील जबाबदारी दिली होती, परंतू त्यांनी यापुर्वीच त्याही पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा पत्र त्यांनी काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवले आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी अत्यंत खेदानं आणि अंतः करणानं मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचा माझा अर्धशतक जुना संबंध तोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे. यावर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, त्यांनी दिलेलं पत्र मी वाचलं आहे. पत्रात ज्या बाबी नमूद केल्या आहेत, त्याचं बाबी आम्ही दोन वर्षांपूर्वी एका गोपनीय पत्राव्दारे दिली होती. त्यावेळी आम्ही पत्रात लिहिलं होतं की, पूर्णवेळ अध्यक्ष असायला हवा. काँग्रेसच्या घटनेप्रमाणे निवडून आलेले सदस्य असावेत अशी आमची मागणी होती अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Rathod | सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानूण आमच्या सरकारचे काम – संजय राठोड
- Nitesh Rane | “भ्रष्ट BMC अधिकाऱ्यांवर कारवाई करावी” ; नितेश राणेंची बीएमसीला पत्राव्दारे मागणी
- Kishori Pednekar | “नितेश राणे स्वतःच्या बापाचे ऐकत नाही” ; किशोरी पेडणेकर संतापल्या
- Operation Lotus : शिवसेनेने ‘ऑपरेशन लोटस’ची तुलना केली ‘अल कायदा’शी , ‘कमळ’ची बदनामी केल्याचा भाजपवर आरोप
- Sudhir Mungantiwar | “भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ची शिवसेनेकडून अल कायदाशी तुलना” ; सुधीर मुनगंटीवारांचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

