🕒 1 min read
मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर पुढच्या महिन्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर होणाऱ्या भारत-इंग्लंड मालिका होणार आहे. या दोन्ही मालिकेसाठीच्या टीम इंडियाची काल (शुक्रवारी) निवड करण्यात आली. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
मात्र, नुकत्याच इंग्लंड दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या कसोटी संघात नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे पृथ्वी शॉला डावलून नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. विजय हजारे ट्रॉफी पासून फॉर्मात असलेला पृथ्वी शॉला मात्र संघात स्थान मिळाले नाही.
शॉला भारतीय टीममध्ये संधी का मिळाली नाही, याचं कारण आता समोर आलं आहे. पृथ्वी शॉला भारतीय टीममध्ये परतायचं असेल, तर त्याला वजन कमी करावं लागेल, असं निवड समितीचं म्हणणं आहे. बीसीसीआयच्या सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, पृथ्वी शॉ 21 वर्षांचा असूनही तो संथ आहे, त्याला वजन कमी करावं लागेल. पृथ्वी शॉच्या आधी ऋषभ पंत यालाही वजन कमी करायला सांगण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
- पीटरसनने सुचवले आयपीएलसाठी योग्य ठिकाण
- शानदार! पाकिस्तानात प्रथमच एक हिंदू मुलगी मोठ्या अधिकारी पदावर
- दिल्लीतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे न्युझीलंडच्या ‘या’ खेळाडूंनी वेळेपुर्वीच घेतला भारताचा निरोप
- कोरोनाचा विस्फोट! अत्यंत गरज असेल तरच आरोपीला अटक करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश
- केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय! रुग्णालयात दाखल होण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक नाही

