Share

पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर चूक; नवाब मलिकांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या बुधवारच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत गंभीर चूक घडल्यावरून मोठे वादळ उठले आहे. यामागे मोठे कटकारस्थान होते, असा दावा करत भाजपने पंजाब सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही चूक नसल्याचे राज्य सरकार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले आहे. त्यामुळे देशातील राजकारण चांगलेच तापले आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते तसेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक होणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाचा केंद्र किंवा राज्य सरकारने तपास न करता हायकोर्टाच्या सिटींग न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास व्हावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

या प्रकरणी आता भाजप (BJP) आणि कॉंग्रेस (Congress) राजकारण करत आहे यावर बोलताना नवाब मलिक म्हणाले, सुरक्षेची जबाबदारी एसपीजी, आयबी आणि राज्य सरकारचे पोलीस या तिघांची असते. त्यामुळे चूक कुणाकडून झाली हे जेव्हा हायकोर्टाच्या सिटींग न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास होईल तेव्हा सत्य काय आहे हे देशाच्या जनतेसमोर येईल, असे नवाब मलिक म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!