🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राजधानी दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर कृषी विधेयकाविरोधात शेतकरी ठाण मांडून बसलाय. शेतकरी आंदोलनाचा आज २१ वा दिवस. परंतु, या शेतकऱ्यांच्या अडचणीत दिल्लीतील थंडी आणखीनच वाढ करणार असं दिसतंय. दिल्लीमध्ये पारा ४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलेला दिसतोय. यामुळे, कोरोना संक्रमण काळात आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना आणखीनच अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
येत्या तीन दिवसांत केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांची दखल न घेतल्यास महाराष्ट्रामधून आंदोलन सुरू केले जाईल आणि हे आंदोलन सर्वांनी दखल घेण्यासारखेच असेल. यापूर्वी देखील आम्ही नाशिक ते मुंबई पर्यंत पायी चालत आलो. त्या आंदोलनाची दखल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावीच लागली. त्यामुळे आमच्या आंदोलनापूर्वी केंद्राने दखल घ्यावी, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी दिला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांना देशापुढे झुकावेच लागणार आहे. तसेच मागील २० दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींसाठी राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. पण तो पाठींबा बाहेरुन दिला असल्याने त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन देखील नवले यांनी यावेळी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘गोड बातमी’ मिळण्याची शक्यता
- प्राचीन मंदिरांचे संवर्धन करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभागृहात घोषणा
- ‘मराठा तरुणांना आरक्षण मिळवून देण्यासाठी टोकाचा संघर्ष करू’
- मोदी सरकारने स्वयंपाक गॅसची किंमत वाढवून सामान्य माणसाला अडचणीत आणण्याचे पाप केले : राष्ट्रवादी
- ‘हा’ मातब्बर नेता करणार अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
