🕒 1 min read
MVA | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना (Shivsena) पक्षावर दावा केल्यानंतर काल या प्रकरणाची सुनावणी होती. त्यामुळे निकाल शिंदेंच्या बाजूने लागणार की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच सुनावणी रद्द झाली. तर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Govt) आलं. मात्र, आता काही कारणांमुळे त्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. अशातच घटनातज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी मोठं विधान करत महाविकास आघाडी सरकार (MVA) पुन्हा सत्तेत येईल असं भाकीत केलं आहे.
राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं असं मोठं विधान घटनातज्ञ उल्हास बापट यांनी केलं आहे. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र झाले तर या आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे, मुख्यमंत्रीच अपात्र झाले तर सरकार पडेल असा दावा उल्हास बापट यांनी केला आहे.
यादरम्यान, राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी महाविकास आघाडीला बोलावलं तर सरकार पुन्हा येऊ शकतं असा दावा देखील बापट यांनी केला आहे.
दरम्यान, शिवसेना कोणाची या प्रकरणाची सुनावणी २९ नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे २९ तारखेला निर्णय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाजूने होणार की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), हे पाहणं महत्वाचं राहिल
महत्वाच्या बातम्या :
- Rahul Gandhi | महाराष्ट्रात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ‘या’ तारखे पासून सुरु, मविआचे ज्येष्ठ नेते घेणार सहभाग?
- Amar Rajurkar । “आमच्याकडे होते तेव्हा ते बरे होते, तिकडे जाऊन बिघडले”; काँग्रेस आमदाराची अब्दुल सत्तारांवर टीका
- Devendra Fadanvis । फडणवीसांनी थेट इलॉन मस्कला केलं रिट्वीट, म्हणाले…
- Sushma Andhare । “ये डर मुझे अच्छा लगा”; सुषमा अंधारेंचा भाजप-शिंदे गटाला टोला
- Gulabrao Patil । “उद्धव ठाकरेंनी २२ आमदारांचंही ऐकून घेतलं नाही” ; गुलाबराव पाटलांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
