नवी दिल्ली : काँग्रेससोबतच्या अयशस्वी चर्चेनंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नव्या राजकीय खेळीचे संकेत दिले आहेत. सोमवारी एका ट्विटद्वारे त्यांनी आपल्या दशकभरातील अनुभव सांगितला आणि बिहारमधून नवी ‘सुरुवात’ करण्याबाबत बोलले. काँग्रेससोबत झालेल्या दीर्घ बैठकीनंतर, किशोर यांनी पक्षाची ऑफर नाकारल्याचे सांगितले होते.
प्रशांत किशोर यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, “लोकशाहीत अर्थपूर्ण सहभागी होण्याचा आणि लोकाभिमुख धोरणाला आकार देण्याचा हा 10 वर्षांचा प्रवास आहे. आता मी नव्याने सुरुवात करणार आहे, खरी काम करण्याची, लोकांपर्यंत पोहोचण्याची, समस्या चांगल्या प्रकारे समजून घेण्याची आणि ‘जन सूरज’च्या मार्गावर जाण्याची हीच वेळ आहे.” त्यांनी ट्विटच्या शेवटी लिहिले की, “बिहारपासून सुरुवात करु”. त्यामुळे त्यांच्या ट्विटवरून असा अंदाज वर्तवला जात आहे की, ते इतर कोणत्याही पक्षासाठी रणनीती बनवण्याऐवजी वेगळा राजकीय पक्ष काढू शकतात.
My quest to be a meaningful participant in democracy & help shape pro-people policy led to a 10yr rollercoaster ride!
As I turn the page, time to go to the Real Masters, THE PEOPLE,to better understand the issues & the path to “जन सुराज”-Peoples Good Governance
शुरुआत #बिहार से
— Prashant Kishor (@PrashantKishor) May 2, 2022
त्यांनी ट्विटमध्ये लिहिलेले ‘जन सूरज’ हे त्यांच्या नव्या पक्षाचे नावही असू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांचा पक्ष पूर्णपणे आधुनिक असेल. डिजिटल माध्यमातून लोकांशी जोडण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे, ज्यामध्ये प्रशांत किशोर देखील विशेष आहेत. याआधी प्रशांत किशोर यांनी भाजप, जेडीयू, टीएमसी, काँग्रेससह अनेक पक्षांसाठी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम केले आहे.
महत्वाच्या बातम्या :


