Share

पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणे अन्यायकारक; मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ देण्याची ‘वंचित’ची मागणी

Published On: 

मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारच्या समितीच्या शिफारशी नुसार सरकारने पदोन्नतीमधील आरक्षणही रद्द केले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयला विरोध होत असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनेही राज्य सरकारचा हा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळ देण्याची मागणी देखील वंचितच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ऑनलाईन बैठकीची मागणी केली आहे. या बैठकीला वंचितचे महत्त्वाचे ३ नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, उपाध्यक्ष धनराज वंजारी, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा ठाकूर यांचा समावेश आहे.

मराठा समाजाला खुष करण्यासाठी सरकार मागसवर्गीय समाजाचा बळी देत असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी या आधी केला होता. त्यांनी सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत आता राज्य सरकारने चर्चा करावी, अशी मागणी केली आहे. राज्यातही विविध ठिकाणी राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!