🕒 1 min read
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली काल(८ डिसें.) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्याचवेळी मंत्रिमंडळाने पीएमएवाय-जी(पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण) मार्च २०२४ पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर(Anurag Thakur) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
यासंदर्भात माहिती देत अनुराग ठाकूर म्हणाले की,’पीएमएवाय-जी अंतर्गत ग्रामीण भागात सर्वांना घरं उपलब्ध करून दिली जातील. ग्रामीण भागातील साधारण २.९५ कोटी लोकसंख्येसाठी पक्की घरं बांधावी लागतील असा अंदाज २०१६ मध्ये वर्तवण्यात आला होता. यापैकी अनेक कुटुंबांना घरं देण्यात आली आहेत.’ तसेच १ कोटी ६७ लाख घरांची उभारणी करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण के अंतर्गत आंकलन किया गया था कि 2 करोड़ 95 लाख लोगों को पक्के मकान की ज़रूरत है। अब तक 1 करोड़ 67 लाख आवास बना कर दिए जा चुके हैं। शेष परिवारों के पक्के मकान बनाने के लिए इस योजना को 2024 तक जारी रखने की मंजूरी दी गई: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर pic.twitter.com/TgB0tovsYb
— ANI_HindiNews (@AHindinews) December 8, 2021
दरम्यान, सरकारी निवेदनानुसार, या योजनेअंतर्गत उर्वरित १.५५ कोटी घरांच्या बांधकामासाठी २.१७ लाख कोटी रुपयांचा खर्च होईल. ज्यामध्ये केंद्र सरकारचे १.२५ लाख कोटी रुपये आणि राज्यांचे ७३ हजार ४७५ कोटी रुपयांचे योगदान असेल. या अंतर्गत नाबार्डला (NABARD)अतिरिक्त व्याजाची परतफेड करण्यासाठी १८ हजार ६७६ कोटी रुपयांची अतिरिक्त गरज भासेल.
महत्वाच्या बातम्या:
- केवळ लष्करच नव्हे, तर अवघा देश या धक्कादायक घटनेमुळे हादरला आहे- राज ठाकरे
- बिपीन रावत यांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश विषण्ण झाला- मुख्यमंत्री ठाकरे
- बिपीन रावत यांची संरक्षण क्षेत्रातील सेवा कायम लक्षात राहील- शरद पवार
- ‘त्यांच्या निधनामुळे मला…’, बिपीन रावत यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
- …त्यांनी केलेली भारतमातेची सेवा राष्ट्र कायम स्मरणात ठेवेल- देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
