औरंंगाबाद : दहशतवादी हल्ला झाल्यास त्याचा कसा सामना करायचा याचे प्रात्याक्षिक रविवारी (दि.३०) सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आले असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे यांनी दिली. पोलिसांचे हे प्रात्याक्षिक पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. दहशतवादी हल्ला झाल्यास पोलिस दल किती सक्षम आहे याचे प्रात्याक्षिक यावेळी करण्यात आले.
रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षात फोन आला की, विभागीय आयुक्त कार्यालयात दहशतवादी शिरले असून त्यांनी चार अधिका-यांना आपल्या ताब्यात घेतले असल्याची माहिती दिली.
त्यानंतर सिटीचौक, बेगमपुरा, हर्सुल, जिन्सी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिका-यांसह गुन्हेशाखा आणि क्युआरटी पथकाची वाहने सायरन वाजवत विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे आजू-बाजूच्या नागरिकांना विभागीय आयुक्त कार्यालयात काय झाले असा प्रश्न पडला होता, परंतु नंतर हे पोलिसांचे मॉकड्रिल असल्याचे समजल्यावर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
महत्वाच्या बातम्या
- अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि विचार जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहे- अजित पवार
- १५ दिवसात १ कोटी रुपये देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा ; निलेश लंके आक्रमक
- वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील; हसन मुश्रीफ यांचा सूचक इशारा
- मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला ; शिवसेना खासदाराची टीका
- ‘अद्याप नव्या कोरोना विषाणूवर ताबा आणू शकलेलो नाही, त्यात तिसरी लाट आली तर…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

