अररिया : बिहारमध्ये एकीकडे दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या अररिया जिल्ह्यात सभा घेतली. यावेळी ते म्हणाले ‘बिहारच्या लोकांना आपलं मत बनवलं आहे. घराणेशाही आणि चमकधमक हरत आहे. घोटाळे पराभूत होत आहेत. लोकांचे न्याय्य हक्क जिंकत आहेत.’ यावेळी त्यांनी म्हटले की ‘प्रत्येक गरीब व्यक्तीला घर दिले जाईल. कोरोनामुळे प्रत्येकाला पक्कं घर मिळण्याचं काम मंदावलं आहे पण ते पुन्हा सुरू होईल.’
मोदी म्हणाले ‘बिहारच्या जनतेच्या मनात अजून जुन्या काळातल्या निवडणुकीच्या नोंदी ताज्या असतील. या लोकांनी निवडणुका म्हणजे खेळ बनवला होता. निवडणुका म्हणजे चोहीकडे हत्या, हिंसा, बूथ कॅप्चरिंग हेच होत असे. सामान्य माणसाचा मतदानाचा अधिकार पण हिरावला गेला होता. बिहार ने अशा जंगलराज आणि डबल-डबल युवराजांना नाकारलं आहे.’ बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये दुसऱ्या टप्प्यात 94 जागांसाठी आज (3 नोव्हेंबर) मतदान होत आहे. 17 जिल्ह्यांमधल्या या जागांसाठी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होईल.
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण 1,463 उमेदवार रिंगणात आहेत. मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव, त्यांचे मोठे भाऊ तेज प्रताप यादव यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांचं भवितव्य मतदानाच्या या दुसऱ्या टप्प्यात निश्चित होईल. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जिल्हा असलेल्या नालंदामध्येही मतदान होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- तिघाडीच्या ठाकरे सरकारची नवी कार्यपद्धती… विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि भटकवा! – आशिष शेलार
- धस म्हणाले; शिवाजी कर्डिले कमळातच राहतील, ते सध्या तरी बदल करण्याच्या मूडमध्ये नाहीत!
- कोथरूडचा आमदार म्हणून येथील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध -पाटील
- विखेंच्या आत्मचरित्रात धक्कादायक खुलासे; इंदिरा गांधी हतबल असताना महाराष्ट्रात झाला होता राजकीय भूकंप!
- अंकिता लोखंडेने मागितली बॉयफ्रेंड विकी जैनची माफी…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

