नवी दिल्ली – गणपती उत्सवासाठी कोंकणात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी करण्या करिता, भारतीय रेल्वेने आता गणपती स्पेशल ट्रेनच्या एकूण १५० ट्रिप्स सोडणार आहे. सर्वप्रथम ७२ त्यानंतर आणखी ४० ट्रिप्स आणि आता ३८ फेऱ्या वाढविण्यात येत आहेत असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज जाहीर केले.
गणपति उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोंकणात जाणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेच्या आता एकून १५० फेऱ्या होणार आहेत. यामध्ये मध्य रेल्वेने आधीच जाहीर केले आहे अश्या 72 फेऱ्या, त्यानंतर मध्य रेल्वेने जाहीर केलेली अतिरिक्त ट्रेनच्या 40 फेऱ्या आणि सध्य परिस्थिती पाहून पश्चिम रेल्वेने आत्ता 38 फेऱ्या भारतीय रेल्वेच्या जाहीर केल्या असून, अश्या एकून १५० गणपती स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या सोडल्या जाणार आहेत. याचे नोटिफिकेशन देखील काढण्यात आले आहे.
कोकणामध्ये जाणाऱ्या प्रत्येक प्रवाश्याची काळजी केंद्र सरकार घेईल. कोणालाही गणपती उत्सव साजरा करायला कोकणात जायला अडचण आम्ही येऊ देणार नाही. तसेच, मुंबई आणि महाराष्ट्र मध्ये ज्या काही अडी-अडचणी असतील, त्यांचे प्रश्न आम्ही सोडविण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत, असे मंत्री दानवे यांनी सांगितले. या पुढे देखील वेटींग लिस्ट वाढली तर आणखी सोय करण्यात येईल. कुठल्या ही प्रवाश्यांना त्रास होऊ देणार नाही, असे दानवे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात बांग्लादेशची ऑस्ट्रेलियावर मात, ५ गडी राखुन केले पराभुत
- केंद्राने राज्यांना आरक्षणाचा अधिकार दिल्यानंतर मराठा संघटनांची ९ ऑगस्टला पुण्यात बैठक
- कांस्यपदक विजेत्या संघातील खेळांडूसाठी पंजाब सरकारकडून १ कोटीचे बक्षिस जाहिर
- नेटकऱ्यांना मिळाला विषय! अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘गणेश चतुर्थीच्या आधी माझं गाणं येणार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

