Share

पालकांनो लक्ष द्या, प्रशासनाचा ‘या’ शाळा बंद करण्याचा निर्णय

Published On: 

औरंगाबाद : सध्या कोरोनाचे संकट औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनपाने शहरातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा १५ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस जोर धरत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात देखील कोरोंणाने जोर धरला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच आहे. मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागाबरोबरच शाळेतही कोरोना रुग्ण आढळून येत आहे. जिल्ह्यातील 49 शाळेत 61 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने शाळा जिल्हा परिषद मार्फत शाळा बंद करण्याच्या हालचाली जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील जिप पहिली ते आठवी पर्यंतच्या शिक्षकांना एक दिवसाआड शाळेत बोलावणार आहे. तर 1ली ते 9 आणि 11 वी च्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात येणार आहे. आश्रमशाळेत देखील 10 वगळता सर्व वर्ग बंद करण्यात येणार आहे. शनिवार, दि. ६ मार्चपासून ग्रामीणच्या शाळा 19 तारखेपर्यंत बंद राहण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत ही चर्चा झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले यांनी दिली. तर लवकरच याबाबत सूचना जारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!