Share

पंकजा मुंडे अडचणीत! वैद्यनाथ साखर कारखान्यावर ईपीएफओ कार्यालयाची मोठी कारवाई

Published On: 

औरंगाबाद : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार भागवत कराड यांना भाजपने मंत्रिपद दिले होते. यामुळे पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांनी याचे खंडन केले असले तरी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांचा संताप दिसून आला. हे प्रकरण ताजे असतानाच पंकजा यांच्यासमोर आणखीन एक अडचण उभी राहिली आहे.

पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या बीड जिल्ह्यातील पांगरी (ता. परळी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) औरंगाबाद विभागीय कार्यालयाने जप्त  केले. त्याद्वारे ९२ लाख रुपयांची थकबाकी वसूल केली.

कारखान्याकडे मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ या काळातील कर्मचारी व कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची एकूण १.४६ कोटी रुपये रक्कम थकीत होती. औरंगाबादच्या ईपीएफओ कार्यालयाने या वर्षातील सर्वात मोठी कारवाई करत कारखान्याचे बँक खाते जप्त करून ९२ लाखांची वसुली केली.
उर्वरित ५६ लाख रुपयांच्या वसुलीसाठी कार्यवाही सुरू आहे.

वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे आंदोलन

तब्बल १९ महिन्याचे वेतन मिळाले नाही म्हणून दहा दिवसात वेतनाचा प्रश्न सोडवा, नाहीतर कारखाना बंद करू असा इशारा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी दिला होता. मात्र दहा दिवस संपल्यानंतर ही पेमेंट न मिळाल्याने अखेर कामगारांनी १० मार्च, २०२१ रोजी साखर कारखाना बंद ठेवत निषेध नोंदवला होता. त्यावेळी हे प्रकरण राज्यात चांगलेच गाजले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!