Share

‘आता जनतेने केंद्र सरकारविरोधात बंड पुकारले पाहिजे’

Published On: 

मुंबई : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज साडे तीन लाखांपेक्षा जास्त लोक कोरोनाने बाधित होत आहेत. औषधं आणि ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. इतकच काय तर स्मशानभूमीत प्रेतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील वेटिंग लिस्ट आहे. अशातच आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणी चिदम्बरम यांनी केली.

पी. चिदम्बरम यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. देशातील जनतेला मूर्खात काढलं जात आहे. सरकारविरोधात जनतेने बंड पुकारले पाहिजे, असं चिदम्बरम म्हणाले. चिदम्बरम यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. ऑक्सिजन, लस आणि रेमडेसिवीरचा कुठलाही तुटवडा नाही, असं वक्तव्य केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केलं. त्यांच्या हे वक्तव्य संताप आणणारे आहे. एवढचं नव्हे तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राज्यात लसीचा कुठलाही तुटवडा नसल्याचं म्हटल्याने आपल्याला राग येतोय, असं चिदम्बरम म्हणाले.

वृत्त वाहिन्यांवर दाखवले जाणारे फुटेज आणि वृत्तपत्रांमधील बातम्या खोट्या आहेत का? डॉक्टर आणि रुग्णांचे नातेवाईक खोटं बोलत आहेत का? सगळे व्हिडिओ बनावट आहेत का? देशातील सर्व नागरिकांना मूर्ख समजणाऱ्या या सरकारविरोधात जनतेने आता बंड पुकारले पाहिजे, असं चिदम्बरम म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!