मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी भाजप पक्ष अनेकविध मुद्द्यांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरून टीका केली आहे.
रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर किंवा त्यांची संपूर्ण व्यवस्था देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात अपयशी होत असेल, तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल, असे मलिक यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करण्याऐवजी देशाचा एक चार्ट बनवून देशातील जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली आहे.
रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर किंवा त्यांची संपुर्ण व्यवस्था देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात अपयशी होत असेल तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.
देशाचा जीडीपी उणे 7.5 टक्क्यांपर्यंत खाली घसरला ही सत्य परिस्थिती आहे. याचा अर्थ रिझर्व्ह बँकेकडून आकलन चुकीचे होत आहे. सरकार पैसे मागतेय तर तुम्ही देताय. रिझर्व्ह बॅंकेला हे कळलं पाहिजे. तुम्ही अंदाज घेत नाही मग देशाची अर्थव्यवस्था कशी चालणार आहे असा सवालही नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘नियमांचं तातडीनं पालन करा अन्यथा परिणामांना सामोरे जा’; सरकारचा ट्विटरला निर्वाणीचा इशारा
- गॅस एजन्सीच्या आमिषाने उद्योजकाला ५६ लाखांचा गंडा घालणारा गजाआड
- अमित देशमुखांच्या सूचनेनुसार शहराच्या स्वच्छतेसाठी सहा जेसीबी सज्ज; आता स्वच्छतेची प्रतीक्षा!
- ‘रस्त्याचे काम रखडल्याने कोरोना रुग्णांचे मृत्यू’, आ. धस यांचा आरोप
- ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधी कोसळले ते कळणारही नाही’


