Share

‘…तरच आंदोलन मागे घेणार, अन्यथा मागे हटणार नाही’; राजू शेट्टी यांचा इशारा

Published On: 

कोल्हापुर: शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. रविवारी सांगली जिल्ह्यात संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण चे कार्यालय जाळले. तसेच दिवसा दहा तास वीज मिळाली पाहिजे, तेव्हाच आंदोलन मागे घेणार, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, हिंसेने प्रश्न सुटत नाही. प्रश्न सोडायला संवाद असतो. त्यांना मी सांगितलं माझ्याशी चर्चा करा जे शक्य असेल ती मी भूमिका घेईल. त्यांनी ते ऐकलं नाही. त्यामुळे हिंसेतून काही विपरीत घडल्यास त्याला सर्वस्वी राजू शेट्टी जबाबदार राहतील, असं राऊत म्हणाले आहेत.

यावर राजू शेट्टी प्रत्युत्तर देत म्हणाले, ऊर्जा मंत्र्यांनी आंदोलनातील नुकसानीची जबाबदारी माझ्यावर टाकून बघावी, विजेच्या दरांची जबाबदारी मी त्यांच्यावर टाकली तर काय होईल विचार करावा, असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!