Share

‘प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते’

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत मागील अडीच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. दोन महिने शांततेत चाललेल्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी गालबोट लागले होते.

२६ जानेवारी रोजी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ संयुक्त शेतकरी संघटनांनी दिल्लीतील हद्दीत प्रवेश करून ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. यावेळी, पोलिसांनी दिलेला मार्ग सोडून आंदोलक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दिल्लीतील इतर भागात वळवला होता. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता धुमश्चक्री उडाली होती. या आंदोलनामुळे प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागले होते. २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर मोर्चावेळी आंदोलकांनी घातलेल्या हैदोसाला दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांना जबाबदार धरलं आहे.

दरम्यान, याबाबत देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी भाष्य केले आहे. उपद्रवी लोकांनी लाल किल्ल्यावर धुडगूस घातला होता. यासंदर्भात पवार यांनी मोठा दावा केला आहे. ‘प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे शेतकरी नव्हते, तर ते सत्ताधाऱ्यांपैकीच होते’, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

‘प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घालण्यात आला त्यासंदर्भात आम्ही खोलवर जाऊन माहिती घेतली. यात, लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे लोक हे शेतकरी नव्हते, तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असे आमच्या लक्षात आले’, असा दावा करत पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!