🕒 1 min read
Congress | मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु आहे. ही यात्रा नांदेड येथून सुरु झाली आहे. विशेष म्हणजे या यात्रेला तरुणांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहिला मिळत आहे. अशातच काँग्रेस (Congress) नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी या यात्रेत अडथळे आणले जात असल्याचा आरोप भाजप (BJP) पक्षावर केला आहे.
यावेळी, भारत जोडो यात्रेमध्ये भाजपाशासित राज्यात अडथळे आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण राज्यात भारत जोडो यात्रा दाखल झाल्यानंतर असे प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात आहे, असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे.
तसेच, ही योजना अत्यंत महत्वपूर्ण असून युपीए सरकारने ती लागू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यावरही टीका करण्यात आली होती, पैसा कोठून येणार, असा सवाल जयराम रमेश यांनी केला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची खिल्ली उडवली होती. पण आजही तीच योजना रोजगार देण्यासाठी मोठा आधार ठरली आहे. अन्न सुरक्षा योजनेलाही नरेंद्र मोदी यांनी विरोध केला होता. आता तीच योजना जनतेला धान्य पुरवण्यास उपयोगी ठरली असल्याचं देखील जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Gajanan Kirtikar | शिंदे गटात गेल्यावरही स्वत:ला निष्ठावंत कसं म्हणता?, प्रश्न विचारताच गजानन कीर्तिकर भडकले, म्हणाले…
- Chhagan Bhujbal | “नुसतं कुणाला हात लावून बाजूला करणे विनयभंग होत असेल तर…” ; छगन भुजबळ यांचे मोठे विधान
- Sushma Andhare | “2012 ला बाळासाहेबांचं निधन, केसरकर 2014 ला शिवसेनेत आले, मग बाळासाहेबांचं हिंदुत्व कधी शिकले?”
- Electric Car Launch | देशातील सर्वात स्वस्त आणि लहान इलेक्ट्रिक कार झाली लाँच
- Eknath Shinde | एकनाथ शिंदे अन् प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
