Share

‘आता महाराष्ट्र शासनाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांचे हित लक्षात घेऊन दहावी आणि बारावी राज्य मंडळाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दरम्यान, सीबीएससी बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तर, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री रमेश निशंक पोखरियाल यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने देखील दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

‘सीबीएससी बोर्डाने दहावी च्या यंदाच्या परीक्षा रद्द करण्याचा अत्यंत योग्य स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. कोरोनाचा कहर वाढत असताना विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने ही निर्णय घेऊन राज्यातील दहावी आणि बारावी च्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती द्यावी,’ अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

‘एसएससी आणि एचएससीच्या परीक्षा यंदा घेणे योग्य होणार नाही. कोरोनाच्या कहरामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळून परीक्षा घेणे योग्य होणार नाही. या पार्श्वभूमीवर सीबीएससी बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा उचित निर्णय घेतला आहे. त्या प्रमाणेच राज्य सरकार ने निर्णय घेऊन 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वार्गोन्नती द्यावी,’ अशी सूचना रामदास आठवले यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!