मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
यामुळे, दुकान चालकांपासून ते लघु उद्योग, स्टार्ट अप्स यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना देखील करावा लागत आहे. अनेक लघु उद्योग, स्टार्ट अप्स, व्यवसाय यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांत बँकांकडून कर्जे घेतली आहेत. सध्याच्या परिस्थितीत त्यांची ओढाताण होते आहे. निर्बंधांमुळे त्यांच्यावर आर्थिक ताण देखील पडत आहे. हे पाहता चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत त्यांच्याकडून हप्ते स्वीकारण्यात येऊ नयेत अशा सूचना बँकांना द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.
गरीब व प्राधान्य गटातील कुटुंबाना अर्थ सहाय्य देण्यात यावे
कोविड संसर्ग हा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत नैसर्गिक आपत्ती म्ह्णून घोषित करावा तसेच टाळेबंदीच्या काळात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारकांना प्रति प्रौढ व्यक्ती दररोज १०० रुपये आणि मुलांना प्रत्येकी ६० रुपये दररोज असे सानुग्रह अर्थसहाय करण्यास राज्य सरकारला परवानगी द्यावी अशी विनंतीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे. एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद निधी) मधील केंद्राच्या वाट्याचा पहिला हप्ता देखील लगेच मिळावा जेणे करून कोविड मुकाबल्यात निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीत मदत होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’ ; व्हायरल गाण्यावर रितेशचा भन्नाट डान्स
- पुणे जिल्ह्यासाठी कोरोना लसीचा कोटा वाढवून द्या, भाजप आमदाराचे जावडेकरांना साकडे
- कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा, मुख्यमंत्री ठाकरेंच पंतप्रधानांना पत्र !
- विराट कोहली ठरला दशकातील सर्वोत्तम खेळाडू
- मला चंपा म्हणणं बंद करा, अन्यथा… चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा


