Share

आता कोणत्याही क्षणी हे सरकार कोसळेल; नारायण राणेंच भाकीत

Published On: 

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून विरोधी पक्षात बसावं लागलेल्या भाजपने आक्रमक भूमिका धारण केली आहे. विविध मंत्र्यांवर होणारे आरोप, कोरोना, अतिवृष्टी यासारखे संकट यामुळे विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. अशातच, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांमध्ये मुख्य आरोपली असलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या लेटर बॉम्बमुळे आता राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

राज्यातील घडामोडींवरून सातत्याने महाविकास आघाडीला लक्ष्य करणाऱ्या भाजप खासदार नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा हल्लबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला असून आणखी काही मंत्र्यांवर गंभीर आरोप होत असल्याने हे सरकार फार काळ टिकणार नसून कोणत्याही क्षणी कोसळेल अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

‘आता काही दिवस देखील नाही तर कोणत्याही क्षणी हे सरकार कोसळेल’ असं भाकीत केलं आहे. याआधी देखील नारायण राणे यांनी सरकार कोसळणार असल्याचं विधान अनेकदा केलं आहे. यासह राणेंनी कोरोना परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी असल्याचं सांगत जो कुटुंबाला सांभाळू शकला नाही, तो महाराष्ट्राला काय सांभाळणार ? असा सवाल देखील उपस्थित केला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील अशा गंभीर आरोपानंतर महाराष्ट्रातील सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!