पुणे – भारताने २०११ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील २ एप्रिल २०११ ला विश्वचषक जिंकला होता. भारत आणि श्रीलंका यांच्यात विश्वचषकाची अंतिम फेरी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळली गेली होती. भारताने वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेचा पराभव करत दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासात प्रथमच एखाद्या संघाने घरच्या मैदानावर चषक उंचावला होता.
अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरेल झहीर खान, गौतम गंभीर आणि महेंद्र सिंह धोनी होय. झहीरने गोलंदाजीत तर धोनी आणि गंभीरने फलंदाजीत शानदार कामगिरी करत भारतीय संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. संपूर्ण मालिकेत युवराज सिंग भारताचा हिरो ठरला होता.अश्या कित्येक आठवणी आज देखील भारतीयांच्या मनात आज दाटून आल्या आहेत.
जिगरबाज खेळ करत केवळ विश्वचषक नव्हे तर धोनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जगभरातील क्रिकेटरसिकांची मनेही जिंकली होती.२०११ तील वर्ल्ड कपच्या विजयी जल्लोषाच्या आठवणींना उजाळा देताना तो जल्लोष अविस्मरणीय आहे, त्या विजयाच्या खुप आठवणी आहेत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत जयंत पाटील यांनी आजच्या दिवशी वर्ल्ड कपच्या आठवणी आपल्या ट्विटद्वारे जाग्या केल्या आहेत.
This day, That year
I was fortunate to watch Dhoni and his team lift #WorldCup2011 and lift the spirits of Indians across the World!
That night we also witnessed Master Blaster handing over the mantle of the indian cricket team to Virat!
So many Memories etched forever… pic.twitter.com/yFQ9cJRt8Y
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 2, 2021
आजच्या दिवशी २ एप्रिल २०११ रोजी टीम इंडियाने कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली तब्बल २८ वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकला होता. आज त्या गोष्टीला १० वर्ष उलटली आहे म्हणून #WorldCup2011 हा हॅशटॅग ट्रेंड चालवत नेटिझन्स त्या दिवशीच्या आठवणींना उजाळा देत आहे. जयंत पाटील यांनी धोनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जगभरातील भारतीयांची मने जिंकली अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘अशक्य ते शक्य’ करणारे रजनीकांत हे चित्रपट व जनमनातलेही महानायक – अजित पवार
- उदयनराजेंना दणका, महाविकास आघाडी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- ‘चिंता नको… ! पवारसाहेब उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत’
- पुण्यात कोरोनाचा उद्रेक ! उद्या कडक निर्बंध लागणार ?
- ‘मानसिक तयारी ठेवा…मंदिरे बंद, दुकाने बंद, मॉल बंद…फक्त पब आणि बार सुरू’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

