मुंबई : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, राज्यामध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काहीसा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
आता राज्यातील निर्बंध पुन्हा १ जूननंतर वाढणार की काही दिलासा मिळणार याकडं राज्यातील जनतेचं लक्ष्य लागलं आहे. दोन महिन्यात व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं असून १ तारखेपासून दुकान उघडणारच असा निर्धार अनेक संघटनांनी केला आहे. यामुळे राज्य सरकारवरील दबाव वाढला आहे. दरम्यान, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत महत्वाचं विधान केलं आहे.
‘लोकांचे प्राण महत्वाचे असून मागचा लॉकडाउन हटवल्यानंतर करोना बाधित रुग्णांचे आकडे अचानक वाढले. आता राज्यात करोना बाधितांची संख्या नक्कीच कमी होतेय, मात्र लगेचच सर्व सुरू केलं जाणार नाही,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. ‘मुंबईतील कोरोना संसर्ग देखील नियंत्रणात आला असल्याचे दिसत आहे. मात्र मुंबईतील रुग्ण पूर्ण कसे घटतील याकडे सध्या आम्ही लक्ष देत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईत अजूनही १३०० ते १४०० रुग्ण आहेत. ही रुग्णसंख्या पूर्णपणे कशी कमी होईल हा आमचा प्रयत्न असणार आहे,’ असं देखील ठाकरे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणविरोधी याचिकांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्याच नेत्यांची आर्थिक रसद; भाजपचा गंभीर आरोप
- पुनावालांचे देशासाठी भरीव योगदान, त्यांना धमक्या येणं हे गंभीर; तातडीने दखल घ्या : उच्च न्यायालय
- महाविकास आघाडीचे सरकार पडणार ही खरंच अफवा असेल तर…; राणेंच्या विधानाने खळबळ
- ‘भाजप ऐकत नसेल तर संभाजीराजेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा’, हर्षवर्धन जाधव यांचा सल्ला
- ‘त्या’ शिक्षिकेचं मुख्यमंत्री ठाकरेंकडे मदतीसाठी आर्जव; तर राज ठाकरेंनी दिला तत्परतेनं मदतीचा शब्द !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

