Share

राज ठाकरेंचा इफेक्ट?; नागपूरात अनेक मशिदींमध्ये पाळण्यात आली आवाजाची मर्यादा

Published On: 

नागपूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोरील भोंग्याबाबत ३ मेचा अल्टीमेटम दिला होता. अन्यथा ४ तारखेपासून  हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले होते. दरम्यान आज पहाटे नागपूर आणि ग्रामीण भागात अनेक मशिदींमध्ये आवाजाची मर्यादा पाळण्यात आल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.

नागपूरमधील जामा मशीदमध्ये आज शांततेत आणि कमी नियमांनी घालून दिलेल्या आवाजात अजान करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या नियमानुसार आवाजाची मर्यादा पाळण्यात आल्याचे येथील स्थानिकांनी म्हटले. तसेच राज ठाकरे यांनी अल्टीमेटम दिला म्हणून नाही, तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनुसार हा नियम पाळण्यात आल्याचेही येथील मौलवींनी म्हटले आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी काल एक पत्रक प्रसिद्ध करत “आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही, त्यांना एकदा हनुमान चालीसा ऐकवाच” असं म्हणत माघार घेण्यास साफ नकार दिला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!