Share

‘कोणताही घोटाळा नाही ‘हे’ आरोप राजकीय द्वेषापोटी’ ; राम मंदिर ट्रस्टचे स्पष्टीकरण

Published On: 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकीत राम मंदिर हा कळीचा मुद्दा राहिलेला आहे आणि अशावेळी हा कथित गैरव्यवहाराचा आरोप झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. अयोध्येतल्या वादग्रस्त आणि बहुचर्चित राम मंदिरासाठीच्या भूखंडाच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटांत 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या आरोपामुळे आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले राम मंदिर पुन्हा एकदा प्रश्नांच्या वादळात अडल्याचे दिसत आहे. आम आदमी पक्षाचे नेते व राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी काही कागदपत्रांच्या आधारे हा आरोप केला आहे. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे आणि या प्रकरणाची चौकशी सीबीआय आणि प्रवर्तन निदेशनालयाने करण्याची मागणी केली आहे. इतक्या कमी वेळात या जमिनीची किंमत इतकी जास्त कशी काय वाढू शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नव्हे तर माजी मंत्री पवन पांडेय यांनीही याच प्रकारचा आरोप केला आहे.

संजय सिंह यांनी केलेले हे आरोप मात्र राम मंदिर ट्रस्टने फेटाळून लावले आहेत. ‘वास्तूशास्त्रानुसार या मंदिराच्या आसपास काही इतर मंदिरे आणि निवासस्थाने बांधण्याची गरज आहे आणि त्यासाठी ज्यांची घरे खरेदी करण्यात आली आहेत त्यांना पुनर्सवसनासाठी जमीन दिली जाणार असल्याचे ट्रस्टने सांगितले आहे. राम मंदिरासाठी खरेदी केलेला सदर भूखंड हा बाजारभावानेच खरेदी करण्यात आला आहे, मात्र काही लोक राजकीय द्वेषामुळे त्याबाबत गैरसमज पसरवत आहेत असे ट्रस्टचे महासचिव आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते चंपत राय यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!