Share

नीती आयोगाच्या ‘या’ अहवालातून उत्तरप्रदेशचे खरे रूप दिसले

Published On: 

नवी दिल्ली: नीती आयोगाने (Niti Aayog) देशातील पहिला बहुआयामी गरिबी निर्देशांक (MPI) जारी केला आहे. आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीत गरिबीच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या पाच राज्यांपैकी चार भाजपशासित राज्ये आहेत. या चार भाजपशासित राज्यांमध्ये आघाडीवर आहे ते म्हणजे योगी आदित्यनाथ यांचे उत्तर प्रदेश राज्य. एकीकडे फक्त विकास काम दाखवणाऱ्या योगी सरकारने मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

नीती आयोगाने जारी केलेल्या निर्देशांकानुसार, बिहारमधील (Bihar) ५१.९१ टक्के लोकसंख्या गरीब आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि जेडीयू युतीचे दीड दशक जुने सरकार आहे, तर डिसेंबर २०१९ पूर्वी भाजपशासित झारखंडमध्ये (Jharkhand) ४२.१६ टक्के लोकसंख्या गरीब आहे. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) ३७.७९ टक्के लोक गरिबीत जगत आहेत.

२०११ च्या जनगणनेनुसार (Census), उत्तर प्रदेशची लोकसंख्या १९.९८ कोटी आहे. त्यापैकी ३७.७९ टक्के लोकसंख्या म्हणजे ७.५५ कोटी लोकसंख्या गरीब आहे. २०११ च्या जनगणनेनुसार बिहारची लोकसंख्या १०.४ कोटी आहे. त्यांच्या लोकसंख्येपैकी सुमारे ५२ टक्के म्हणजेच ५४ दशलक्ष लोकसंख्या दारिद्र्यात जगत आहे. नीती आयोगाने जाहीर केलेल्या या अहवलातून उत्तर प्रदेश राज्याचे खरे रूपच बाहेर काढले असं म्हणलं तर त्यात वावगे ठरणार नाही.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

नीती आयोगाच्या ‘या’ अहवालातून उत्तरप्रदेशचे खरे रूप दिसले

Published On: 

नवी दिल्ली: नीती आयोगाने (Niti Aayog) देशातील पहिला बहुआयामी गरिबी निर्देशांक (MPI) जारी केला आहे. आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीत गरिबीच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या पाच राज्यांपैकी चार भाजपशासित राज्ये आहेत. या चार भाजपशासित राज्यांमध्ये आघाडीवर आहे ते म्हणजे योगी आदित्यनाथ यांचे उत्तर प्रदेश राज्य. एकीकडे फक्त विकास काम दाखवणाऱ्या योगी सरकारने मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

नीती आयोगाने जारी केलेल्या निर्देशांकानुसार, बिहारमधील (Bihar) ५१.९१ टक्के लोकसंख्या गरीब आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि जेडीयू युतीचे दीड दशक जुने सरकार आहे, तर डिसेंबर २०१९ पूर्वी भाजपशासित झारखंडमध्ये (Jharkhand) ४२.१६ टक्के लोकसंख्या गरीब आहे. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) ३७.७९ टक्के लोक गरिबीत जगत आहेत.

२०११ च्या जनगणनेनुसार (Census), उत्तर प्रदेशची लोकसंख्या १९.९८ कोटी आहे. त्यापैकी ३७.७९ टक्के लोकसंख्या म्हणजे ७.५५ कोटी लोकसंख्या गरीब आहे. २०११ च्या जनगणनेनुसार बिहारची लोकसंख्या १०.४ कोटी आहे. त्यांच्या लोकसंख्येपैकी सुमारे ५२ टक्के म्हणजेच ५४ दशलक्ष लोकसंख्या दारिद्र्यात जगत आहे. नीती आयोगाने जाहीर केलेल्या या अहवलातून उत्तर प्रदेश राज्याचे खरे रूपच बाहेर काढले असं म्हणलं तर त्यात वावगे ठरणार नाही.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!