Share

Nilesh Rane : “…त्यांच्यामुळेच तुझा बाप त्या खुर्चीवर बसला आहे”, ‘त्या’ वक्तव्यावरून निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंना सुनावले

Published On: 

मुंबई: एकनाथ शिंदे गटात फूट पडल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटातील एक गट सातत्याने उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.  या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधत बंडखोर आमदारांवर जहरी टीका केली. “बरं झाली घाण गेली. पर्यावरण मंत्री म्हणून महाराष्ट्रात घाण साचू देऊ नये हे माझं काम आहे.”, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले. ते मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये बोलत होते. यावरूनच भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी टोला लगावला आहे.

“तीस तीस वर्ष जे शिवसेनेत आहेत त्या आमदारांना घाण म्हणण्याचा नीचपणा पेंग्विन ने दाखवला, ज्यांना घाण म्हटलं त्यांच्यामुळेच तुझा बाप त्या खुर्चीवर बसला आहे. याचा बाजार लवकरच उठणार आणि भर रस्त्यात उठणार.”, असा इशारा निलेश राणे यांनी ट्वीट करत दिला आहे.

दरम्यान आदित्य ठाकरे म्हणाले, “बरं झाली घाण गेली. पर्यावरण मंत्री म्हणून महाराष्ट्रात घाण साचू देऊ नये हे माझं काम आहे. आता घाण साफ झाली आहे. ज्यांना मदत केली, ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचे वाईट वाटते. बंडखोर आमदारांमध्ये जर हिंमत असती तर बंड करण्यासाठी सूरतला जाण्याची काय गरज होती?” असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!