🕒 1 min read
मुंबई : दिवसभराच्या चढ-उतारादरम्यान अखेरच्या तासामध्ये झालेल्या खरेदीमुळे भारतीय शेअर बाजार सकारात्मक वाढीसह बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने ५५,८५४.८८ अंकाच्या पातळीपर्यंत तर निफ्टीने १६,६२८.५५ अंकाच्या विक्रमी पातळीपर्यंत उसळी घेतली होती. व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स २०९.६९ अंकाच्या वाढीसह ५५,७९२.२७ पातळीवर तर निफ्टी ५१.५५ अंकाच्या वाढीसह पहिल्यांदाच १६,६१४.६० या पातळीवर बंद झाला.
मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३० प्रमुख शेअरपैकी २० शेअर वाढीसह तर १० शेअर लाल निशानीवर बंद झाले. यामध्ये टेक महिंद्राचे शेअर ३.२१ टक्के तर टीसीएसचे शेअर २.३२ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये १.८३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात आयटी क्षेत्रातील निर्देशांकात २.५७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
मुंबई शेअर बाजारातील ३,२८८ शेअरमध्ये व्यवहार झाले असून यातील १,१४१ शेअर तेजीसह तर २,०२७ शेअर लाल निशानीवर बंद झाले. याच बरोबर लिस्टेड कंपन्यांचा एकूण मार्केट कॅप २४०.७९ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सोमवारी देखील मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात तेजी नोंदवण्यात आली होती. सोमवारी सेन्सेक्स १४५ अंकांच्या तर निफ्टी ३३.९५ अंकाच्या वाढीसह बंद झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार देशाचे माननीय नेते, त्यांच्यावर आपण काय टीका करणार – राज्यपाल कोश्यारी
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘नाचता येईना अंगण वाकडे’ ही महाविकास आघाडी सरकारची सद्यस्थिती-बावनकुळे
- १३४ प्रवासी क्षमता असणाऱ्या विमानात तब्बल ८०० प्रवासी; विमानाची अवस्था मुंबई लोकलसारखी !
- योगी सरकारकडून पुन्हा एक नामकरण; आता ‘अलीगढ’ होणार ‘हरिगड’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
