रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागला आहे. राजापूर तालुक्यातच आरआरपीसीएलचा तेल शुद्धीकरणाचा कारखाना व्हावा यासाठी समर्थकांनी आणखी एक पाऊल उचलंलं आहे. त्यानुसारी दुसऱ्या प्रकल्प समर्थक समितीची स्थापना केली गेली आहे. यामध्ये 34 जणांना समावेश असून राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ काझी समितीच्या अध्यक्षपदी आहेत.
देवाचे गोठणे-सोलगाव-नाटे दशक्रोशी रिफायनरी समर्थक समिती असं या समितीचं नाव आहे. गावांमध्ये समन्वय राखला जावा या दृष्टीनं ही दुसरी समिती स्थापन केली गेली आहे. त्यामुळे रिफायनरीसाठी समर्थक सर्वकाही करत असून राजकीय इच्छाशक्ती वर या प्रकल्पाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगावच्या सड्यावर प्रकल्प व्हावा यासाठी सध्या सर्वच स्तरातील प्रकल्प समर्थक आपली ताकद लावताना दिसून येत आहे.
नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत थोडक्यात माहिती
कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या सीमेवर नाणार तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प प्रस्तावित होता. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 14 गावं आणि सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील 2 गावांमध्ये प्रकल्पाचा विस्तार होणार होता. 13000 एकरावर हा प्रकल्प उभारला जाणार होता. नागरिकांचा विरोध असतानाही, या गावांमधील क्षेत्र 18 मे 2017 रोजी आद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं. हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्या नाणार रिफायनरी प्रकल्प उभारत असून, त्यांची संयुक्तपणे रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल लिमिटेड म्हणजेच RRPCL कंपनी 22 सप्टेंबर 2017 रोजी स्थापन करण्यात आली.
काही महिन्यांपूर्वीच सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीशी नाणार रिफायनरीबाबत करार झाला. नाणार रिफायनरीच्या उभारणीला तीन लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आशियातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प असल्याचे सांगण्यात येत असून, 2023 पर्यंत हा प्रकल्प कार्यन्वित करण्याचा सरकारचा विचार आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पापासून अवघ्या 15-16 किलोमीटरच्या अंतरावर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- छावणी भागात बायोमेडिकल वेस्टचा ढिगारा, पालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!
- महिला काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयात दिली शेणाची गौरीची भेट, इंधन दरवाढीचा निषेध
- कोविडचा फायदा घेत मुंबईतील 500 गृहनिर्माण सोसायट्या प्रशासकांकडून परस्पर बिल्डरच्या घशात?
- रिक्षा चालकाने प्रवासी वृध्दाची बॅग लांबवली
- बाचाबाची झाली पण भाजपच्या एकाही नेत्याने शिवीगाळ केलेली नाही – फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

