जालना: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र राज्य सरकार कमालीचा हलगर्जीपणा करत आहे. लसीकरण व्यवस्थित होत नसल्याने राज्य पुन्हा एकदा कोरोना हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे हे एक कारण असण्याची शक्यता माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केले आहे.
माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवार पासून पाहणी दौऱ्यात जिल्ह्यातील जालना, परतूर व मंठा येथील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण कक्षाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी यांच्याबरोबर चर्चा केली. त्यानंतर लोणीकरांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहीत राज्य सरकारच्या कामावर टीका केली.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण “आयएमसीआर “ या केन्द्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेच्या मार्गदर्शनानुसार चालत आहे. की, नाही यावर कठोर लक्ष ठेवणारी फिरती पथके केन्द्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने तयार करावीत व त्यांनी या लसीकरण प्रक्रियेवर कडक नजर ठेवावी. अशी मागणी लोणीकर यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- घरपट्टी व नळपट्टीवरील व्याज होणार १००% माफ; परभणी मनपाचा निर्णय
- बनारस हिंदू विद्यापीठामध्ये प्राध्यापिका नीता अंबानी देणार विद्यार्थ्यांना धडे
- जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक, एका दिवसात ११६ रुग्ण
- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावत व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने
- जनतेने नाकारले म्हणूनच केजरीवाल सरकारला काम न करू देण्याचे भाजपचे धोरण ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
