जालना : देशासह राज्यात कोरोनापाठोपाठ ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याने आता अधिक चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्षांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू होत असल्याने राज्य सरकारने त्या संदर्भातील उपाययोजना सुरु केल्या आहेत.
यासंदर्भात, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील भाष्य करून गांभीर्यता स्पष्ट केली आहे. कोरोनाकाळात राजेश टोपे यांनी नियोजन करून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी योजना आखल्या होत्या. दरम्यान, बर्ड फ्लूबाबत ते म्हणाले, ”बर्ड फ्लू हा अत्यंत धोकादायक आजार असून या आजाराचा मृत्यू दर १० ते १२ टक्के आहे. हे लक्षात घेता ‘बर्ड फ्लू’बाबत जास्तीत जास्त सावधानता बाळगणं गरजेचं आहे. त्यासाठी राज्यात हायअलर्ट जारी करायला हवा. पशुसंवर्धन व आरोग्य विभागानं तातडीनं उपाययोजना सुरू करायला हव्यात’ असं ते म्हणाले आहेत. यासंदर्भात ‘मटा’ने वृत्त दिलं आहे.
परभणीसह मुंबई व ठाण्यात देखील बर्ड फ्लूचा शिरकार !
परभणीत 3 दिवसांपूर्वी मुरुंबा तालुक्यातील 800 कोंबड्याचा मृत्यू हा ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याची माहिती समोर आली आहे. परभणी जिल्हा प्रशासनाने मृत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवले होते. या नमुन्यांचे अहवाल आले असून मुरुंबा येथील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे या प्रयोगशाळेने सांगितले आहे. यामुळे राज्य शासनाने या घटनेनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम नियुक्त केल्या आहेत.
अशातच, राज्यातील चिंता आणखी वाढणार आहे. मुंबई आणि ठाण्यात देखील मृत पक्षांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्याचे समजत आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी दोन कावळ्यांचा मृत्यू झाला होता. या कावळ्यांचा स्वॅब घेऊन ते भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग संस्थेकडे पाठवण्यात आला होते. त्याचे अहवाल आज आले आहेत. यात दोन्ही कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर ठाण्यात देखील अनेक पक्षांचा मृत्यू झाला होता. यातील पाण बगळे आणि 1 पोपट बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारने महाराष्ट्रात देखील कोविडची लस सर्वसामान्यांसाठी मोफत उपलब्ध करून द्यावी ‘
- भारतीय चाहत्यांसह सेहवागनेही केलं ट्विटरवर रिकी पाँटिंगला ट्रोल
- काम कसे करायचे हे घरबशा मुख्यमंत्र्यांना सांगा,सल्ल्याची गरज त्यांना जास्त आहे : भातखळकर
- बर्ड फ्लूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
- औरंगाबाद शहरात ‘ती’ सुरक्षित आहे का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

