मुंबई : भाजपासोबतची युती तुटल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर खूप मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आतापासूनच मुंबई महापालिका जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
शिवसेनेने यासाठी अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातली आहे.
दरम्यान एका बाजूला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे तर दुसऱ्या बाजूला शिवसेना देखील अमराठी मतांसाठी जोरदारपणे तयारीला लागली आहे. .
विशेष म्हणजे शिवसेनेकडून यासाठी गुजरातींसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून त्याला ही अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद…
शिवसेनेने साद घातली असली तरी गुजराती मतदाराने मनात ठाम ठरवले आहे "मुंबई मा जलेबी ना फाफडा, 'जनाबसेने'ला आपटा" pic.twitter.com/yAESKdSAvw— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 5, 2021
दरम्यान,शिवसेनेचा मुख्य विरोधक असलेल्या भाजपने या मुद्द्यावरून देखील टीका केली आहे. शिवसेनेने साद घातली असली तरी गुजराती मतदाराने मनात ठाम ठरवले आहे ”मुंबई मा जलेबी ना फाफडा, ‘जनाबसेने’ला आपटा” असं म्हणत आ. अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली.
महत्वाच्या बातम्या
- शंकरराव गडाखांच्या प्रयत्नातून शनिशिंगणापूर ग्रामपंचायत 15 वर्षांनंतर बिनविरोध!
- काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी कोरोना लसीला मान्यता देण्याच्या प्रक्रियेवर केले ‘हे’ प्रश्न उपस्थित
- चिमुकल्या झिवाच बाबा धोनी सोबत जाहिरात क्षेत्रात पदार्पण
- प्रदेशाध्यक्षपदासाठी आता तरुणांना संधी द्यावी,आम्ही त्यांच्या मागे उभे राहू : बाळासाहेब थोरात
- गिरीश महाजन अडचणी वाढल्या; पुण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

