🕒 1 min read
अहमदनगर: सध्या राज्यात नगरपंचयातीच्या निवडणुका पार पडल्या असून आता निकाल जाहीर होत आहेत. मतमोजणीला पक्षांमध्ये चांगलीच चुरस दिसून येत आहे. राज्यातील नगर पंचायतीचा पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला. त्यानंतर कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व निर्माण केलं आहे. या निवडणुकीत १७ पैकी १२ जागा जिंकून राष्ट्रवादीने कर्जत नगरपंचायतीवर एक हाती सत्ता आणली आहे.
आज सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीलाच कर्जत नगरपंचायतीचा निकाल लागला आहे. त्यात राष्ट्रवादीला १७ पैकी १२ जागा मिळाल्या असून भाजपला दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे. कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात कांटे की टक्कर होती, मात्र यावर आता रोहित पवार यांनी बाजी मारली असल्याचे दिसत आहे.
कर्जत नगरपंचायतीत १७ पैकी राष्ट्रवादी काँग्रेस १२ आणि काँग्रेस ३ अशा एकूण १५ जागांवर दणदणीत विजय!
सर्व विजयी उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन आणि मतदारांचे मनःपूर्वक आभार!????
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 19, 2022
भाजपचे राम शिंदे (BJP leader Ram Shinde) यांनी भाजपचीच सत्ता येईल असा विश्वास दाखवला होता. तसेच रोहित पवार यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे. राम शिंदे म्हणतात, दबाव, दडपशाही, पैशाचा उतमात आणि सत्तेची मस्ती यापूर्वी कर्जतदारांनी पाहिली नव्हती, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘नाना पटोलेंवर कारवाई झाली नाही तर…’; भाजप शिष्टमंडळांचं राज्यपालांना निवेदन
-
‘मोदींच्या हत्येच्या कटाला राहुल गांधींची सहमती?’; चित्रा वाघ यांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
