Share

नक्षलवाद्यांचा मोबाईल टॉवरसह पंचायत इमारतीवर हल्ला, अपहरणाची शक्यता

Published On: 

पटणा : बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी रात्री नक्षलवाद्यांनी एका मोबाईल टॉवरसह पंचायत इमारत स्फोटकांनी उडवल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर सीआरपीएफसह मोठ्या प्रमाणावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

घटना मदनपूरच्या जुदाही भागात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील अत्यंत नक्षलग्रस्त मदनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुडाही येथे आलेल्या एका नक्षलवाद्यांच्या टोळीने मोबाईल टॉवरसह पंचायतीची इमारत उडवली.

दरम्यान, नक्षलवादी संघटना सीपीआय-माओवाद्यांनी २३ ते २५ नोव्हेंबर दरम्यान झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्यांमध्ये बंद ची हाक दिली आहे. माओवादी नेता प्रशांत घोष उर्फ किशन दा आणि त्याची पत्नी शीला मरांडी यांच्या अटकेच्या निषेधार्थ त्यांनी बंद पुकारला आहे. नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंददरम्यान या सर्वच राज्यात पोलिसांनी गस्त वाढली आहे. सर्व महामार्गांवर पोलीस गस्त घालताना दिसून येत आहेत. याशिवाय संवेदनशील भागात अतिरिक्त फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

औरंगाबादचे एसपी कांतेशकुमार मिश्रा याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले, नक्षलवाद्यांनी मोबाईल टॉवर उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलाचे एक पथक पाठवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पण, काही लोकांचे अपहरण केल्याची माहिती तपासानंतर सांगता येईल.  याची माहिती सध्या घेतली जात आहे, संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर स्पष्टपणे यावर बोलता येईल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!