🕒 1 min read
मुंबई : दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधलेल्या या संवादादरम्यान मोदींना भावना अनावर झाल्या. कोरोनाने झालेल्या मृत्यूंमुळे मोदी भावूक झाले असल्याचे यावेळी पाहायला मिळाले. कोरोनाशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक जवळच्या लोकांना गमावलं आहे, असं मोदी म्हणाले. डॉक्टरांसोबत बोलताना मोदींचा हुंदका दाटला असल्याचे यावेळी दिसले.
यावर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी टीका केलेली आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत स्वतःच्या केबिनमध्ये बसून व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बोलताना मोदीसाहेब नेहमी परचा आणि मास्क वापरत होते. मात्र त्याचदिवशी परचा आणि मास्क दोन्ही गायब होते, याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.’ असे विधान करून त्यांनी मोदींवर टीकास्त्र डागलेले आहे.
नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजपवर व केंद्र सरकारवर टीकास्त्र डागताना पाहायला मिळत आहे. यामुळेच आता भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मलिकांवर धमकी वजा इशाराच दिला आहे. ‘ड्रग्जच्या आरोपाखाली अटक झालेल्या जावयाची सुटका होत नसल्यामुळे नवाब मलिक यांचं डोकं फिरलय, त्या फ्रस्ट्रेशनमधून त्यांची बेताल बडबड सुरू आहे. त्यांनी तोंड वेळीच बंद कराव, नाही तर कळेल अशा भाषेत उत्तर देऊ.’ असा इशाराच अतुल भातखळकर यांनी मालिकांना दिला आहे.
ड्रग्जच्या आरोपाखाली अटक झालेल्या जावयाची सुटका होत नसल्यामुळे @nawabmalikncp यांचं डोकं फिरलय, त्या फ्रस्ट्रेशनमधून त्यांची बेताल बडबड सुरू आहे. त्यांनी तोंड वेळीच बंद कराव, नाही तर कळेल अशा भाषेत उत्तर देऊ. pic.twitter.com/FXOPT2oJV5
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 23, 2021
दरम्यान, देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा सर्व भीषण परिस्थितीमध्ये सतत चालू असलेल्या राजकारणाला आता जनता कंटाळलेली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘त्या’ अधिकाऱ्याच्या विधानाशी आमचा संबंध नाही; या लढाईत आम्ही सरकार सोबत आहोत – सीरम
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
- राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !
- बारावीच्या परीक्षांचा निर्णय लवकरच; राज्य सरकारांना २५ मे पर्यंत सूचना देण्याची वेळ
- निलेश लंकेंच चहुबाजुंनी कौतुक; भाजप आमदार श्वेता महाले म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
