🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ३ मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिक यांची तब्बल आठ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारचे नेते आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. तर दुसरीकडे मलिकांच्या राजीनाम्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, नवाब मलिक यांना झालेली अटक राजकीय सुडातून झाली आहे, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. तसेच ३० वर्षे जुने प्रकरणं काढलं आहे. ही फक्त राजकीय आकसातून केलेली कारवाई आहे. नवाब मलिक भाजपवर टीका करते होते म्हणून त्यांना टार्गेट केलं आहे, असंही चव्हाण म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
“…ते प्रकरण निवडणूक संपताच शांत झालं”, रोहित पवारांचे ट्विट चर्चेत
Russia-Ukraine war : जागतिक दबाव तरी, युक्रेनमध्ये रशियाचे आक्रमण दुसऱ्या दिवशीही सुरूच
“ठाकरे सरकारच्या “डर्टी डझन” मधील २ नावे मी विसरलो, ती म्हणजे…”, सोमय्यांचा हल्लाबोल


