मुंबई – कोंबडा आरवला नाही तरी सकाळ व्हायची थांबत नाही आणि झोपला तरी सकाळ होण्याचे थांबत नाही त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्या कोंबड्यासारखी अवस्था झाली असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
माझ्यामुळे इतर पक्षाचे लोक बाहेर फिरायला लागले असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याला जोरदार प्रत्युत्तर नवाब मलिक यांनी दिले आहे.कोंबडयाला वाटतं मी आरवलो नाही तर सकाळ होणार नाही तसं होत नाही. कोंबडा झोपला तरी सकाळ होते हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यायला हवे असेही नवाब मलिक म्हणाले.
कोंबडा आरवला नाही तरी सकाळ व्हायची थांबत नाही आणि झोपला तरी सकाळ होण्याचे थांबत नाही अशी अवस्था देवेंद्र फडणवीस यांची झालीय. pic.twitter.com/1CitE7CLIx
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 20, 2020
आमचे नेते पवारसाहेब असतील किंवा मंत्री शेतकरी अडचणीत आल्यावर त्यांना धीर देण्यासाठी शेताच्या बांधावर जावून धीर देणं ही पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सांगत आहेत तर त्यांची अवस्था त्या कोंबड्यासारखी झाली आहे असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या-
- ‘नुकसानीचा आढावा घेवून राज्य शासन मदतीबाबत मंत्रीमंडळ बैठकीत विचार करेल’
- ‘अजितदादांनीच आता शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 50 हजार कोटी रुपयांची मदत करावी’
- लोकप्रतिनिधीच महिलांना ‘आइटम’ म्हणत असतील तर इतरांनी काय आदर्श घ्यावा ?
- जाणून घ्या पुणे विभागातील कोरोनाची नेमकी काय आहे स्थिती ?
- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची त्वरित नियुक्ती करा-भाजपा महिला मोर्चा


