Share

‘देशात मोदी सरकार आल्यापासूनच गोडसेंचा गौरव सुरू झाला’, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रायपूर येथे दोन दिवसीय ‘धर्म संसद’ आयोजित करण्यात आली होती. रविवारी(२६ डिसें.) या संसदेचा समारोप झाला. तसेच मिळालेल्या माहितीनुसार या धर्म संसदेत अकोल्याच्या कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले. फक्त एव्हढेच नाही तर महात्मा गांधींवर शिवीगाळ करत त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येबद्दल नथुराम गोडसेचे कौतुकही केले. या प्रकरणानंतर सर्व स्तरावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात नवाब मलिक यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’देशात मोदी सरकार आल्यापासूनच गोडसेचा गौरव सुरू झाला आहे. आता मर्यादा ओलांडून महात्मा गांधींना बदनाम करण्याचे काम सुरू आहे.’, असे मलिक म्हणाले आहेत. तसेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून भोंदू महाराज असलेल्या कालीचरणला अटक करावी, अशी आमची मागणी आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर कालीचरण महाराज यांच्यावर रविवारी सायंकाळी आयपीसीच्या कलम ५०५(२) आणि २९४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!